अंकलखोप दि. ०४ : मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृती जोपासावी यादृष्टीने व मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी " पुस्तकांचे " गाव ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळचे मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी विस्तारीत स्वरूपात सुरू करुन या बाबतचा शासन निर्णय २५ मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले आणि पुणे महसूल विभागात सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप (औदुंबर) या गावाला "पुस्तकांचे गाव" योजनेचा विस्तार करण्यास मान्यता देण्यात होती.
शासन मान्यता देण्यात आलेल्या "पुस्तकांचे गाव" या गावांमध्ये विविध प्रकारचे साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन पर ग्रंथांनी सुसज्ज असे भव्यदिव्य दालने होणार होती.
याबाबतच्या बातम्या देखील अनेक प्रसार माध्यमामधून आल्या होत्या.
परंतु गेल्या तीन वर्षापासून त्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.
वाचन संस्कृती वाढावी व मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने " पुस्तकाचे गाव " या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करून शासन मान्यता देण्यात आलेल्या पलूस तालुक्यातील अंकलखोप (औदुंबर) या गावामध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून दालने तयार करण्यात यावीत.या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून अंकलखोप-औदुंबर सह परिसरातील लोकांना व येथे येणार्या प्रत्येक पर्यटकांना याचा लाभ घेता येईलया आशेयाचे निवेदन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे २९ मे २०२५ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विटा येथील एका कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पलूस तालुका अध्यक्ष संदीप पवार यांनी दिले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰