व्हिडीओ
पलूस दि. ०७ : किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथे उड्डाणपूल आणि भुयारी पुलाची कामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत याचा भविष्यकाळात सर्वांना त्रास होणार आहे. यामुळे अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू होणार आहे. महा रेल ने चुकीच्या पद्धतीने ही कामे केली असून एम आर आय डी सी च्या सर्व कामांची चौकशी व्हावी व दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई होऊन झालेल्या खर्चाची भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करून घ्यावी. यासह इतर मागण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ पत्रकार अख्तर पिरजादे यांनी किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आज या आंदोलनाचा चा पाचवा दिवस होता.आंदोलनाच्या ठिकाणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलूस कडेगाव चे विधानसभा क्षेत्र चे अध्यक्ष निलेश येसूगडे, पलूस तालुक्याचे अध्यक्ष सारंग माने,अरुण ब्रम्हे, कपिल गायकवाड, ताजबी शिकलगार,पोपट पवार,
संदीप वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.यावेळी निलेश येसूगडे म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी केलेल्या मागण्या अगदी बरोबर आहेत या पुलावरून ऊस वाहतूक होणार नाही.अनेक अपघात होणार आहेत. यासह इतर सर्व मागण्यांचा आम्ही पाठपुरावा करू त्या पूर्ण होण्यास सर्वतोपरी मदत करू या आंदोलनास त्यांनी लेखी पाठिंबा दिला.
यावेळी अख्तर पिरजादे म्हणाले, रेल्वे संबंधी 22 मागण्या व इतर मागण्या घेऊन मी आंदोलनाला बसलो आहे.सर्व मागण्या होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील. संबंधित लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन सदरच्या मागण्या पूर्ण होण्याकरिता प्रयत्न करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰