BANNER

The Janshakti News

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ कडून सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर येथे पाहणी.



======================================
======================================

भिलवडी | दि. २१ एप्रिल २०२३

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पाहणी समितीने सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर येथे  ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनाचे  क्षेत्र औदुंबर ता.पलूस येथे आयोजित करण्यासाठी जागेची पाहणी केली.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वसकर , कार्यवाह उज्वला मेहेंदळे , सदस्य नरेंद्र पाठक , सुनिताराजे पवार , प्रा. किरण सागर , प्रदीप दाते आदी पदाधिकाऱ्यांचा पाहणी पथकात समावेश होता.




मान्यवरांनी औदुंबर येथील दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरुंचे दर्शन घेतले.कवी सुधांशु यांच्या निवास स्थानास भेट दिली.सदानंद साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारी दहा मिनीटाची ध्वनी चित्रफीत मान्यवरांना दाखविण्यात आली. 

यावेळी चितळे उद्योग समुहाचे उद्योजक गिरीश चितळे म्हणाले की,औदुंबर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करून आम्हाला साहित्याची सेवा करण्याची संधी द्यावी.चितळे उद्योग समूह,परिवार व साहित्य रसिक उस्फूर्तपणे स्वागत करून  साहित्य मंडळाने दिलेली जबाबदारी सार्थ पणे पार पाडून ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवू असे मनोगत व्यक्त केले.


 औदुंबर येथे  प्रशासन अखिल भारतीय साहित्य संमेलनाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. 
..पलूस चे तहसीलदार निवास ढाणे

रमेश वसकर म्हणाले की, आम्ही फक्त संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी जागा पाहण्याचे काम करून हा अहवाल अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्या कडे सादर करू.त्यानंतर मंडळाची बैठक होऊन साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरवायचे यावर शिक्कमोर्तब होईल.

मोठ्या शहरापेक्षा ही ग्रामीण भागातील साहित्य रसिकांमध्ये साहित्याविषयी मोठी आवड आहे.औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाने अखिल भारतीय साहित्य संमेलन आपल्याकडे व्हावे यासाठी असलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचे उज्वला मेहेंदळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.


माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम,जयंत पाटील,अरुण आण्णा लाड, खा. संजय काका पाटील,पालकमंत्री सुरेश खाडे,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदींसह प्रमुख नेते मंडळी सर्वोतोपरी सहकार्य करून संमेलन यशस्वी करणार असल्याची माहिती संबंधितांच्या प्रतिनिधींनी सांगितली.

 शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, घनःश्याम सुर्यवंशी,उदय पाटील,चंद्रकांत पाटील,सुभाष कवडे,प्रदीप पाटील,वासंती मेरू आदींनी मनोगत व्यक्त केले.
चितळे उद्योग समुहाचे उद्योजक गिरीश चितळे,तहसीलदार निवास ढाणे भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत,सरपंच राजेश्वरी सावंत, उपसरपंच सौ.रोहिणी चौगुले,विश्वनाथ मिरजकर, डॉ.प्रदीप पाटील,सुभाष कवडे, प्रा.संतोष काळे,उमेश जोशी, गजानन सुर्यवंशी,हणमंत पाटील, मेरू,रमजान मुल्ला,हिम्मत पाटील,अरुण नाईक,सुनिल भोसले,शरद जाधव आदींसह साहित्यिक उपस्थित होते.
 
त्रिलोकनाथ जोशी यांनी स्वागत केले.शहाजी सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन वासुदेव जोशी,विभव जोशी यांनी केले तर आभार पुरुषोत्तम जोशी यांनी मानले.


 औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळास  रमेश वसकर,उज्वला मेहेंदळे,गिरीश चितळे,नरेंद्र पाठक,सुनीताराजे पवार आदींनी भेट दिली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆