BANNER

The Janshakti News

अन्यथा मंत्र्यांना, आमदारांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही... वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी समोर तीव्र निदर्शने...




अन्यथा मंत्र्यांना, आमदारांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही...

वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी समोर तीव्र निदर्शने...



सांगली :
दि. ११ नोव्हेंबर २०२१

     गेल्या दीड वर्षापासून कोरोणामुळे लॉकडाऊन असल्यामुळे पूर्णपणे व्यापार व व्यवसाय सुरू नाही. ह्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेच्या उद्योगक्षेत्रात ह्याचा फार मोठा परिणाम होतो आहे आणि जनजीवन विस्कळीत झाला आहे तरी आपण मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याक लोकांना कर्जाच्या स्वरूपाने  आर्थिक मदत करावी जेणे करून सध्याच्या परिस्थितीत ह्या लोकांना उद्योगधंदे पुन्हा एकदा चालू करण्यास मदत होईल. मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधे अल्पसंख्याक लोकांच्या उद्योगव्यवसायासाठी मागील सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये एकही रुपये दिलेले नाही तरी आपण सर्वसामान्य अल्पसंख्याक लोकांच्या मदतीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याक लोकांना कर्जाच्या स्वरूपाने आर्थिक मदत करावी.


     शैक्षणिक कर्ज मर्यादा ५ लाखावरून वाढवून ती २० लाखांपर्यंत करण्यात यावी.

    सध्या महामंडळाच्या कार्यालयात कर्मचारी वर्ग खूपच अल्प आहे तो वाढविण्यात यावा ज्यामुळे कामात गती निर्माण होईल सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे व मुख्यालय या मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या खूपच अल्प आहे व ते ही कायमस्वरूपी नाहीत तरी ह्या महामंडळामध्ये सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी करून नवीन कर्मचाऱ्याची त्वरित भरती करण्यात यावी.

    गेल्या पाच वर्षात शैक्षणिक कर्ज वगळता एक ही व्यवसाय व उद्योग धंद्यासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आली नाही तरी ही कर्ज योजना तात्काळ सुरू करण्यात येऊन ती नियमित करण्यात यावी.

   नवीन कर्ज योजनांचा समावेश करण्यात यावे उदा. गृहकर्ज योजना, वाहनकर्ज योजना 
  
सदर मागण्याचे निवेदन देण्या करिता आम्ही दीड महिन्यापासून राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची वेळ घेत आहे परंतु श्री. कदम यांच्या ऑफिस कडून भेटण्या करिता टाळाटाळ केली जात आहे म्हणून आम्ही आज सांगली जिल्हा काँग्रेस ऑफिस तसेच कवठेमहांकाळ, तासगांव, जत या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांना निवेदन देत आहोत. 

आमच्या मागण्या पूर्ण करून अल्पसंख्याक समाज्यासाठी न्याय व हक्क मिळवून द्यावा अन्यथा राज्यमंत्री विश्वजीत कदम व महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना, आमदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडी कडून देण्यात आला. 

यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा संघटक संजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात,सांगली शहर अध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, मिरज तालुकाध्यक्ष संजय अशोक कांबळे, प्रवक्ते गौतम लोटे,वसंत भोसले, अनिल अंकलखोपे,सम्युअल सारा, मिरज शहर अध्यक्ष सतिश शिकलगार, जावेद भाई, ऋषिकेश माने आदी सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.